Monday, June 27, 2011

ग्रेस यांच्या कविता



पूर्ण नाव : माणिक सीताराम गोडघाटे 
जन्म : १० मे १९३७  नागपूर 
माणिक गोडघाटे हे कवी ग्रेस म्हणून साहित्यविश्वात प्रसिद्ध आहेत. परमेश्वरी कृपा या अर्थाने त्यांनी हे साहित्यिक नाव धारण केले आहे. ’संध्याकाळच्या कविता’ या १९६७ साली प्रसिद्ध झालेल्या काव्यसंग्रहामुळे ते चर्चेत आले. अगदी अर्पणपत्रिकेपासून ते स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये काही ओळी देण्याची पद्धत अशा खास गोष्टी त्यांनी त्या पुस्तकाद्वारे आणल्या आणि ती परंपरा पुढेही चालू ठेवली. पाच काव्यसंग्रह आणि तितकेच ललितलेखसंग्रह ही साहित्यिक ग्रेस यांची (सर्वांना सहजपणे कळू शकणारी) कामगिरी आहे. "बाईला समजून घेणे हा माझ्यामधील पुरूषाचा पुरुषार्थ आहे" असे त्यांनी कित्येकदा जाहीरपणे सांगितले आहे. "परमेश्वराने विश्व निर्माण करताना चुका केल्या आहेत, त्या सुधारणे हा माझ्यासारख्या कलावंताचा धर्म आहे" असेही त्यांचे सांगणे आहे. आजमितीला ज्यांचे साहित्य उपलब्ध आहे त्या सर्व मराठी कवींपैकी ’समजण्यास अत्यंत अवघड’ इथपासून ते ’केवळ शब्द-अभियांत्रिकी, अर्थच नाही’ इथपर्यंतच्या टीका त्यांच्या कवितांवर झालेल्या आहेत.

प्रकाशित साहित्य

नावसाहित्यप्रकारप्रकाशनप्रकाशन वर्ष (इ.स.)
संध्याकाळच्या कविताकवितासंग्रहपॉप्युलर प्रकाशन१९६७
राजपुत्र आणि डार्लिंगकवितासंग्रहअमेय प्रकाशन,पॉप्युलर प्रकाशन१९७४
चर्चबेलललित लेखसंग्रहपॉप्युलर प्रकाशन१९७४
चंद्रमाधवीचे प्रदेशकवितासंग्रहपॉप्युलर प्रकाशन१९७७
मितवाललित लेखसंग्रहपॉप्युलर प्रकाशन१९८७
सांध्यपर्वातील वैष्णवीकवितासंग्रहपॉप्युलर प्रकाशन१९९५
संध्यामग्न पुरुषाची लक्षणेललित लेखसंग्रहपॉप्युलर प्रकाशन२०००
मृगजळाचे बांधकामललित लेखसंग्रहपॉप्युलर प्रकाशन२००३
सांजभयाच्या साजणीकवितासंग्रहपॉप्युलर प्रकाशन२००६
वाऱ्याने हलते रानललित लेखसंग्रहपॉप्युलर प्रकाशन२००८
कावळे उडाले स्वामीललित लेखसंग्रहपॉप्युलर प्रकाशन२०१०
निष्पर्ण तरुंची राई


भय इथले संपत नाही,मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकविली गीते...

हे झरे चंद्र सजणांचे, ही धरती भगवी माया
झाडांशी निजलो आपण, झाडांत पुन्हा उगवाया

त्या वेळी नाजूक भोळ्या, वारयाला हसवून पळती
क्षितीजांचे तोरण घेऊन, दारावर आली भरती

तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शुनी गेला
सीतेच्या वनवासातील जणू राघव शेला

देऊळ पलिकडे तरीही, तुज ओंजळ फुटला खांब
थरथरत्या बुबूळापाशी, मी उरला सुरला थेंब

संध्येतील कमल फ़ुलासम, मी नटलो श्रृंगाराने
देहाच्या भवती रिंगण, घालती निळाईत राने

स्त्रोत्रात इंद्रिये अवघी, गुणगुणती दु:ख्ख कुणाचे
हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाचे

ते धुके अवेळी होते, की परतायची घाई
मेंदुतून ढळली माझ्या, निष्पर्ण तरुंची राई...



~ग्रेस 
ही कविता कवी ग्रेस यांच्या”चंद्रमाधवीचे प्रदेश” या काव्य संग्रहात आहे.
============================================================
घर थकले संन्यासी 


घर थकले संन्यासी : हळू हळू भिंतही खचते
आईच्या डोळ्यांमधले नक्षत्र मला भासवते

ती नव्हती संध्या मधुरा, रखरखते ऊनच होते
धग ओढुनी संधेवानी आभाळ पसरले होते

पक्षांची घरटी होती : ते झाड तोडले कोणी
एक एक ओंजळी मागे असतेच झर्यांचे पाणी

मी भिऊन अंधाराला, अडगळीत लपूनी जाई
ये हलके हलके मागे त्या दरीतली वनराई
~ग्रेस
============================================


ती गेली तेव्हा रिमझिंम , पाउस निनादत होता
मेघात अडकली किरणे, हा सूर्य सोडवीत होता

ती आई होती म्हणूनी, घनव्याकूळ मी ही रडलो
त्यावेळी वारा सावध, पाचोळा उडवीत होता

अंगणात गमले मजला, संपले बालपण माझे
खिडकीवर धुरकट तेव्हा, कंदील एकटा होता




चित्रपट : निवडुंग 
गीत : ग्रेस 
संगीत : प. हृदयनाथ मंगेशकर
स्वर : प. हृदयनाथ मंगेशकर
=========================================


2 comments: