Sunday, July 24, 2011

LAST THREE WISHES OF ALEXANDER THE GREAT

ALEXANDER THE  GREAT

EMPIRE OF ALEXANDER 


Three last wishes!

Alexander, the great Greek king, after conquering many kingdoms, was returning home. On the way, he fell ill and it took him to his death bed. So, the mighty conqueror lay prostrate and pale, helplessly waiting to breathe his last.

He called his generals and said, "I will depart from this world soon, I have three wishes, please carry them out without fail." With tears flowing down their cheeks, the generals agreed to abide by their king's last wishes. "My first desire is that," said Alexander, "My physicians alone must carry my coffin." After a pause, he continued, "Secondly, I desire that when my coffin is being carried to the grave, the path leading to the graveyard be strewn with gold, silver and precious stones which I have collected in my treasury." The king felt exhausted after saying this. He took a minute's rest and continued. "My third and last wish is that both my hands be kept dangling out of my coffin."

Alexander's favorite general kissed his hand and pressed them to his heart. "O king, we assure you that your wishes will all be fulfilled. But tell us why do you make such strange wishes." At this Alexander took a deep breath and said: "I would like the world to know of the three lessons I have just learnt. I want my physicians to carry my coffin because people should realize that no doctor can really cure any body. They are powerless and cannot save a person from the clutches of death. So let not people take life for granted.

The second wish of strewing gold, silver and other riches on the way to the graveyard is to tell people that not even a fraction of gold will come with me. I spent all my life earning riches but cannot take anything with me. Let people realize that it is a sheer waste of time to chase wealth. And about my third wish of having my hands dangling out of the coffin, I wish people to know that I came empty handed into this world and empty handed I go out of this world." With these words, the king closed his eyes. Soon he let death conquer him and breathed his last.

I REMEMBER FEW LINES OF FAMOUS KAWWALI,

तू यहाँ मुसाफिर है, ये सारे फ़ानी है
चार रोज़ की महिमा तेरी जिंदगानी है
धन ज़मीं जर ज़ेवर कुछ न साथ जायेगा
ख़ाली हाथ आया है, ख़ाली हाथ जायेगा


याद रख सिकंदर के हौंसले तो आली थे
जब गया था दुनिया से दोनों हाथ खाली थे
अब न वो हला-कू है, और न उसके साथी हैं
जंग-जू व पोरस हैं, और न उसके हाथी है

कल जो तन के चलते थे अपनी शान-ओ-शौक़त पर
शम्मा तक नहीं जलती आज उनकी तुर्बत पर
अदना हो या आला हो, सबको लौट जाना है
मुफलिस-ओ-तवंगर का क़ब्र ही ठिकाना है

जैसी करनी वैसी भरनी, आज किया कल पायेगा
सर को उठाकर चलनेवाले, इकदिन ठोकर खायेगा

मौत सबको आनी है कौन इससे छूटा है
तू फना नहीं होगा ये ख़याल झूठा है
साँस टूटते ही सब रिश्ते टूट जायेंगे
बाप माँ बहन बीवी, बच्चे छूट जायेंगे

छीनकर तेरी दौलत, दो-ही गज़ क़फ़न देंगे
दो-ही गज़ क़फ़न देंगे, दो-ही गज़ क़फ़न देंगे
लाके क़ब्र में तुझको मुर्दा पाक़ डालेंगे
अपने हाथों से तेरे मुंह पे ख़ाक़ डालेंगे

मुट्ठी बाँधके आने वाले हाथ पसारे जाएगा
धन दौलत जागीर से तूने क्या पाया, क्या पाएगा
ढलता सूरज धीरे-धीरे ढलता है ढल जाएगा
ढलता सूरज धीरे-धीरे ढलता है ढल जाएगा


Saturday, July 23, 2011

उठा उठा चिऊताई-कुसुमाग्रज


उठा उठा चिऊताई

उठा उठा चिऊताई
सारीकडे उजाडलें
डोळे तरी मिटलेले
अजुनही, अजुनही

सोनेरी हे दूत आले
घरटयाच्या दारापाशी
डोळयांवर झोप कशी
अजुनही, अजुनही ?

लगबग पांखरे हीं
गात गात गोड गाणे
टिपतात बघा दाणे
चोहींकडे, चोहींकडे,

झोपलेल्या अशा तुम्ही
आणायाचें मग कोणी
बाळासाठी चारापाणी
चिमुकल्या, चिमुकल्या ?

बाळाचें मी घेतां नांव
जागी झाली चिऊताई
उडोनीया दूर जाई
भूर भूर, भूर भूर,

~ कुसुमाग्रज

Thursday, July 21, 2011

काही कविता - कुसुमाग्रज



पृथ्वीचे प्रेमगीत 

युगामागुनी चालली रे युगे ही
करावी किती भास्करा वंचना
किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी
कितीदा करु प्रीतीची याचना

नव्हाळीतले ना उमाळे उसासे
न ती आग अंगात आता उरे
विझोनी आता यौवनाच्या मशाली
ऊरी राहीले काजळी कोपरे

परी अंतरी प्रीतीची ज्योत जागे
अविश्रांत राहील अन् जागती
न जाणे न येणे कुठे चालले मी
कळे तू पुढे आणि मी मागुती

दिमाखात तारे नटोनी थटोनी
शिरी टाकिती दिव्य उल्काफुले
परंतु तुझ्या मूर्तीवाचून देवा
मला वाटते विश्व अंधारले

तुवा सांडलेले कुठे अंतराळात
वेचूनिया दिव्य तेजःकण
मला मोहवाया बघे हा सुधांशू
तपाचार स्वीकारुनी दारुण

निराशेत सन्यस्थ होऊन बैसे
ऋषींच्या कुळी उत्तरेला ध्रृव
पिसाटापरी केस पिंजारुनी हा
करी धूमकेतू कधी आर्जव

पिसारा प्रभेचा उभारून दारी
पहाटे उभा शुक्र हा प्रेमळ
करी प्रीतीची याचना लाजुनी
लाल होऊनिया लाजरा मंगळ

परी दिव्य ते तेज पाहून पूजून
घेऊ गळ्याशी कसे काजवे
नको क्षूद्र शृंगार तो दुर्बळांचा
तुझी दूरता त्याहुनी साहवे

तळी जागणारा निखारा उफाळून
येतो कधी आठवाने वर
शहारून येते कधी अंग तूझ्या
स्मृतीने उले अन् सले अंतर

गमे की तुझ्या रुद्र रूपात जावे
मिळोनी गळा घालुनीया गळा
तुझ्या लाल ओठातली आग प्यावी
मिठीने तुझ्या तीव्र व्हाव्या कळा

अमर्याद मित्रा तुझी थोरवी अन्
मला ज्ञात मी एक धुलिःकण
अलंकारण्याला परी पाय तूझे
धुळीचेच आहे मला भूषण

~ कुसुमाग्रज
=====================================================
मंथर नाग

ओतीत विखारी वातावरणी आग
हा वळसे घालित आला मंथर नाग,
मधुनीच उभारी फणा, करी फूत्कार
ये ज्वालामुखिला काय अचानक जाग!

कधि लवचिक पाते खड्‍गाचे लवलवते,
कधि वज्र धरेवर गगनातुन कडकडते,
कधि गर्भरेशमी पोत मधे जरतार
प्रमदेचे मादक वस्त्र जणू सळसळते.

मार्गावर याच्या लवत तृणाची पाती
पर्णांवर सुमने मोडुनि माना पडती
थरथरती झुडुपे हादरती नववेली
जग गुलाम सारे या सम्राटापुढती.

चालला पुढे तो-काय ऐट!आनंद!
अग्नीचा ओहळ ओहळतो जणु मंद,
टाकली यमाने कट्यार वा कनकाची
चालली बळींचा वेध घेत ही धुंद.

वा ताण्डव करता सोम प्राशुनी काली
रक्तात नाहली,शिरमुंडावळ भाली
थयथया नाचता नरड्यांवर प्रेतांच्या,
हे कंकण निखळुनि पडले भूवर काली.

चालला पुढे तो लचकत मुरडत मान,
अवतरे मूर्तिमान्‌ मल्हारातिल तान
चांचल्य विजेचे,दर्याचे गांभीर्य
चालला मृत्युचा मानकरीच महान!

हा थांब-कुणाची जाळीमधे चाहूल,
अंगारकणापरि नयन कुणाचे लाल,
आरक्त ओठ ते ध्वजा जणू रक्ताच्या,
रे नकूल आला!आला देख नकूल!

थबकलाच जागी सर्प घालुनी वळसा,
रिपु समोर येता सोडुनि अन्‌ आडोसा,
भूमीस मारुनी मागे तीव्र तडाखा,
घे फणा उभारुन मरणाचा कानोसा.

पडलीच उडी! की तडितेचा आघात!
उल्केपरि तळपत कण्यात घुसले दात,
विळख्यावर विळखे कसून चढवी सर्प,
फुंफाट करी अन्‌ पिशापरी त्वेषात!

रण काय भयानक, लोळे आग जळात!
आदळती,वळती,आवळती क्रोधात,
जणु जिंकायासी गगनाचे स्वामित्व
आषाढघनांशी झुंजे वादळवात!

क्षणि धुळीत गेली वहात तो विषधार
शतखंडित झाले ते गर्वोन्नत ऊर
विच्छिन्न तनूतुनि उपसुनि काढुनि दात
वायापरि गेला नकुल वनातुनि दूर.

संग्राम सरे , रक्ताचे ओघळ जाती,
आनंदे न्हाती त्यात तृणाची पाती,
पिंजून कापसापरी पडे तो नाग,
ते खंड गिळाया जमले किटक भोती!

~कुसुमाग्रज

=================================================
भेट अशी की...

भेट अशी की जिला पालवी
कधीच फुटली नाही
कोर शशीची घनपटलातून
कधीच सुटली नाही

मिठीविना कर रितेच राहिले
दिठीही फुलली नाही
ओठांमधली अदीम ऊर्मी
तशीच मिटली राही

युगायुगांचा निरोप होता
तोही कळला नाही
समीप येऊनी स्वर संवादी
राग न् जुळला काही

खंत नसे पण एक दिलासा
राहे हृदयी भरूनी
अलौकिकाची अशी पालखी
गेली दारावरूनी

~कुसुमाग्रज

'पाथेय' काव्यसंग्रहातून
============================================================
अनंत 
एकदा ऐकले काहींसें असें
असीम अनंत विश्वाचे रण
त्यात हा पृथ्वीचा इवला कण
त्यांतला आशिया भारत त्यांत
छोट्याशा शहरीं छोट्या घरांत

घेऊन आडोसा कोणी 'मी' वसें
क्षुद्रता अहो ही अफाट असें!
भिंतीच्या त्रिकोनी जळ्मट जाळी
बांधून राहती कीटक कोळी


तैशीच सारी ही संसाररीती
आणिक तरीही अहंता किती?
परंतु वाटलें खरें का सारें?
क्षुद्र या देहांत जाणीव आहे
जिच्यात जगाची राणीव राहे!


कांचेच्या गोलांत बारीक तात
ओतीत रात्रीत प्रकाशधारा
तशीच माझ्या या दिव्याची वात
पाहते दूरच्या अपारतेंत!

अथवा नुरलें वेगळेंपण
अनंत काही जेंत्याचाच कण!
डोंगरदऱ्यांत वाऱ्याची गाणीं
आकाशगंगेत ताऱ्यांचे पाणीं

वसंतवैभव उदार वर्षा
लतांचा फुलोरा
केशरी उषा....प्रेरणा यांतून सृष्टीत स्फुरे
जीवन तेज जें अंतरी झरे

त्यानेच माझिया करी हो दान
गणावे कसे हें क्षुद्र वा सान?

~ कुसुमाग्रज 
=======================================================
'कोलंबसचे गर्व गीत'

हजार जिव्हा तुझ्या गर्जु दे प्रतिध्वनिने त्या
समुद्रा, डळमलु दे तारे !
विराट वादळ हेलकाउदे पर्वत पाण्याचे
ढळुदे दिशाकोन सारे !

ताम्रसुरा प्राशुन मातुदे दैत्य नभामधले
दडुद्या पाताळी सविता
आणि तयांची ही अधिराणी दुभंग धरणीला
करायला पाजुळुदे पलीता !

की स्वर्गातुन कोसळलेला, सुड समाधान
मिळाया प्रमत्त थैमान
जमवुनी मेळा वेताळांचा या दर्यावरती
करी हे तांडव थैमान

पदच्युता ,तव भिषन नर्तन असेच चालु दे
फ़ुटुदे नभ माथ्यावरती
आणि , तुटुदे अखंड ऊल्का वर्षावात अग्नी
नाविका ना कुठली भिती

सहकार्यानो, का हि खंत जन्म खलाशाचा
झूंजण्या अखंड संग्राम
नक्षत्रापरी असीम नभामध्ये संचरावे
दिशांचे आम्हांला धाम

काय सागरी तारू लोटले परताया लोटले
असे का आपुला बाणा
त्याहुनी घेऊ जळी समाधि सुखे , कशासाठी
जपावे पराभुत प्राणा

कोट्यावधी जगतात जिवाणु जगती अन मरती
जशी ती गवताची पाती
नाविक आम्ही परंतु फ़िरतो सात नभांखाली
निर्मीतो नव क्षितिजे पूढती !

मार्ग आमुचा ना रोधु शकतिल ना धन, ना दारा
घराची वा वितभर कारा
मानवतेचे निशान मिरवू महासागरात
जिंकु खंड खंड सारा !

चला उभारा 
शुभ्र  शिडे ति गर्वाने वरती
कथा या खुळ्या सागराला
” अनंत आमुची ध्येयसक्ती अनंत अन आशा
किनारा तुला पामराला ”

~कुसुमा
ग्रज
=========================================================
बर्फाचे तट पेटुनि उठले सदन शिवाचे कोसळते
रक्त आपुल्या प्रिय आईचे शुभ्र हिमावर ओघळते

असुराचे पद भ्रष्ट लागुनी आज सतीचे पुण्य मळे
अशा घडीला कोण करंटा तटस्थतेने दूर पळे ?
कृतांत ज्वाला त्वेषाची ना कोणाच्या हृदयात जळे ?
साममंत्र तो सरे, रणाची नौबत आता धडधडते

सह्यगिरीतिल वनराजांनो, या कुहरातुनि आज पुढे
रक्त हवे जर स्वतंत्रतेला, रक्ताचे पडतील सडे
एक हिमाचल राखायाला करा हिमाचल लक्ष खडे
समरपुरीचे वारकरी हो, समरदेवता बोलविते

खडक काजळी घोटुनि तुमचे मनगट-बाहू घडलेले
कडेकपारीमधील वणवे उरात तुमच्या दडलेले
काबुल-कंदाहार पथावर डंके तुमचे झडलेले
शिवतेजाची दीपमाळ पाठीशी अपुल्या पाजळते

कोटि कोटि असतील शरीरे मनगट अमुचे एक असे
कोटि कोटि देहात आजला एक मनीषा जागतसे
पिवळे जहरी सर्प ठेचणे - अन्य मना व्यवधान नसे
एक प्रतिज्ञा, विजय मिळेतो राहिल रण हे धगधगते
~ कुसुमाग्रज


Sunday, July 17, 2011

'राजकवि' भास्कर रामचंद्र तांबे

घन तमी शुक्र बघ राज्य करी 
घन तमी शुक्र बघ राज्य करी |
रे खिन्न मना बघ जरा तरी ||
ये बाहेरी अंडे फोडोनी |
शुद्ध मोकळ्या वातावरणी |
का गुदामरशी आतच कुढूनी |
रे मार भरारी जरा वरी ||

घन तमी शुक्र बघ राज्य करी |
रे खिन्न मना बघ जरा तरी ||

फुल गळे फळ गोड जाहले |
बीज नुरे डौलात तरू डुले |
तेल जळे बघ ज्योत पाजळे |
का मरणी अमरता हि न खरी ||

घन तमी शुक्र बघ राज्य करी |
रे खिन्न मना बघ जरा तरी ||

मना वृद्धा का भिशी मरणा |
दार सुखाचे ते हरी करुणा |
आई पाही वाट रे मना |
पसरुनी बाहू कवळण्या उरी ||

घन तमी शुक्र बघ राज्य करी |
रे खिन्न मना बघ जरा तरी ||

~भा रा तांबे

'राजकवी' भास्कर रामचंद्र तांबे





भास्कर रामचंद्र तांबे (ऑक्टोबर २७, १८७३ - इ.स. १९४१) अर्वाचीन मराठी कवींमधील एक मान्यताप्राप्त कवी. ते ग्वाल्हेर संस्थानाचे ’राजकवी’ होते. ’तांबे यांची समग्र कविता’ या ग्रंथात त्यांची कविता प्रकाशित झाली आहे. त्यांना आधुनिक मराठीतील गीतकाव्याचे प्रवर्तक मानण्यात येते.'राजकवी' श्री. भास्कर रामचंद्र उर्फ भा.रा. तांबे यांचा जन्म २७ ऑक्टोबर १८७४ साली मध्यप्रदेशातील मुगावली या गावी झाला. प्रारंभीचे शिक्षण त्यांनी झांशी येथील पुसाळकर यांच्या खासगी शाळेत आणि त्यानंतर वैदिकाचे शिक्षण घेतले. 

मध्यप्रदेशात वास्तव्य असल्यामुळे हिंदी आणि उर्दू या भाषेचे त्यातील काव्याचे त्यांच्यावर संस्कार झाले. त्यानी प्रथम देवासच्या हायस्कूलमध्ये व नंतर युवराजांचे शिक्षक म्हणून नोकरी केली. त्यांचे राजघराण्याबरोबर इंदूरला वास्तव्य होते. तेथे संस्थांचे दिवाण, सरकारी वकील, न्यायाधीश, शिक्षण खात्यात रजिस्ट्रार इत्यादी पदे भूषविली. १९३७ मध्ये "ग्वाल्हेरचे राजकवी" हा बहुमान त्यांना मिळाला.

साधारण १९०० साली त्यांचा पहिला काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला. त्यांनी सुनीत या काव्य प्रकारात काही कविता लिहिल्या. या स्वतंत्र प्रतिभेच्या कविने नाट्यगीतेही लिहिली. त्या काळातील सुप्रसिद्ध मध्य भारतीय कवी संमेलनाचे १९२६ मध्ये ते अध्यक्ष होते. १९३२ मध्ये कोल्हापूर येथे भरलेल्या साहित्य संमेलनाच्या कवी संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान त्यांना मिळाला.

अशा या सौंदर्यवादी, भावनाप्रधान कवीचे ७ डिसेंबर १९४१ साली निधन झाले. पण आपल्या काव्यामुळे ते आजही अजरामर आहेत.
काव्य्संग्रहः
१. भास्कर रामचंद्र तांबे यांची कविता,
संपा. : वा. गो. मायदेव (१९२०)
२. तांबे यांची कविता, भाग २ रा,
संपा. : दि. गं. केळकर ( १९२७)
भास्कर रामचंद्र तांबे यांची समग्र कविता,
संपा. : मा. त्रिं. पटवर्धन ( १९३५ )

त्यांच्या काही प्रसिध्द कविता -

  • जन पळभर म्हणतिल हाय हाय!
  • नववधू प्रिया मी बावरते
  • कळा ज्या लागल्या जीवा
  • मावळत्या दिनकरा
  • तिन्ही सांजा सखे मिळाल्या



नववधू प्रिया मी बावरते

नववधू प्रिया मी बावरते. लाजते, पुढे सरते, फिरते ॥ ध्रु ॥
कळे मला प्राणसुखा जरि, कळे तूच आधार सुखा जरी
तुजवाचुनि संसार फुका जरि, मन जवळ यावया गांगरते ॥ १ ॥
मला येथला लागला लळा, सासरी निघता दाटतो गळा
बागाबगीचा येथला मळा, सोडिता कसे मन चाचरते ॥ २ ॥
जीव मनीचा मनी तळमळे, वाटे बंधन करुनि मोकळे
पळत निघावे तुजजवळ पळे, परि काय करु, उरी भरभरते ॥ ३ ॥
चित्र तुझे घेउनि उरावरि, हारतुरे घालिते परोपरि,
छायेवरि संतोष खुळी करि, तू बोलविता परि थरथरते ॥ ४ ॥
अतां तूच भय लाज हरी रे, धीर देउनी ने नवरी रे
भरोत भरतिल नेत्र जरी रे, कळ पळभर मात्र, खरे घर ते ॥ ५ ॥
गायक/गायिका: 
लता मंगेशकर
संगीतकार: 
वसंत प्रभु
गीतकार: 
भा.रा.तांबे
अधिक टिपा: 
चवथे कडवे लताने गायलेले नाही


जन पळभर म्हणतिल ‘हाय हाय’

जन पळभर म्हणतिल ‘हाय हाय’
मी जाता राहिल कार्य काय?

सूर्य तळपतिल, चंद्र झळकतिल,
तारे अपुला क्रम आचरतिल,
असेच वारे पुढे वाहतिल,
होईल काहि का अंतराय?

मेघ वर्षतिल, शेतें पिकतिल,
गर्वाने या नद्या वाहतिल,
कुणा काळजी की न उमटतिल
पुन्हा तटावर हेच पाय?

सखेसोयरे डोळे पुसतिल,
पुन्हा आपुल्या कामि लागतिल
उठतिल, बसतिल, हसुनि खिदळतिल
मी जातां त्यांचे काय जाय?

रामकृष्णही आले, गेले
त्यांविण जग का ओसचि पडले?
कुणी सदोदित सूतक धरिले?
मग काय अटकले मजशिवाय?

अशा जगास्तव काय कुढावे?
मोहि कुणाच्या कां गुंतावे?
हरिदूता कां विन्मुख व्हावे?
कां जिरवुं नये शांतीत काय?

~भा. रा. तांबे 

संगीत वसंत प्रभू
स्वर लता मंगेशकर 




मावळत्या दिनकरा
मावळत्या दिनकरा अर्घ्य तुज 
जोडुनि दोन्ही करा !


जो तो वंदन करी उगवत्या, 
जो तो पाठ फिरवि मावळत्या,
रीत जगाची ही रे सवित्या !
स्वार्थपरायणपरा 

उपकाराची कुणा आठवण ?
‘शिते तोवरी भूते’ अशी म्हण; 
जगात भरले तोंडपूजेपण, 
धरी पाठिवर शरा !

आसक्त परि तू केलीस वणवण, 
दिलेस जीवन, हे नारायण,
मनी न धरिले सानथोरपण,
समदर्शी तू खरा !

प्रभु-सचिवा विरही मुखधूसर 
होति दयामृदु नयनिष्ठुर कर 
टाकुनि कारभार चंद्रावर
चाललास तू खरा ! 

~भा.रा.तांबे

कळा ज्या लागल्या जीवा...
कळा ज्या लागल्या जीवा मला कीं ईश्वरा ठाव्या !
कुणाला काय हो त्यांचे ? कुणाला काय सांगाव्या ?
उरीं या हात ठेवोनी उरींचा शूल का जाई ?
समुद्रीं चौंकडे पाणी, पिण्याला थेंबही नाही,
जनांच्या कोरड्या गप्पा, असे सारे जगद्बंधू !
हमामा गर्जनेचा हो, न नेत्रीं एकही बिंदू.
नदीला पूर हा लोटे, न सेतू ना कुठे नावा
भुतांची झुंज ही मागे, धडाडे चौंकडे दावा.
नदी लंघोनी जे गेले तयांची हाक ये कानीं,
इथे हे ओढिती मागे मला बांधोनी पाशांनी.
कशी साहूं पुढे मागे जिवाला ओढ जी लागे?
तटातट काळिजाचे हे तुटाया लागती धागे.
पुढे जाऊं ? वळूं मागे ? करूं मी काय रे देवा ?
खडे मारी कुणी, कोणी हसे, कोणी करी हेवा !

कवी - भास्कर रामचंद्र तांबे

मरणांत खरोखर जग जगते

मरणांत खरोखर जग जगते
अधीं मरण अमरपण ये मग ते

अनंत मरणे आधीं मरावी
स्वातंत्र्याची आस धरावी
मारील मरणचि मरणा भावी
मग चिरंजीवपण ये मग ते

सर्वस्वाचे दान आधीं करी
सर्वस्वच ये तुझ्या घरी
सर्वस्वाचा यज्ञ करी तरी
रे! स्वयें सैल बंधन पडते

स्वातंत्र्याचा एकचि ठावा
केवळ यज्ञचि मजला ठावा
यज्ञ मार्ग ! हो यज्ञ विसावा
का यज्ञाविण काही मिळते?

सीता सति यज्ञीं दे निज बळी
उजळुनि ये सोन्याची पुतळी
बळी देऊनी बळी हो बळी
यज्ञेच पुढे पाऊल पडते

यज्ञिं अहर्निश रवि धगधगतो
स्वसत्वदाने पाश छेदितो
ज्योतिर्गण नव जन्मुनि जगतो
रे स्वभाव हा! उलटे भलते

प्रकृति-गती ही मनिं उपजुनियां
उठा वीर कार्पंण्य त्यजुनिया;
'जय हर!'गर्जा मातेस्तव या!
बडबडुनी काही का मिळते?

भा.रा.तांबे
सायंकाळची शोभा
पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेर
ओढा नेई सोने वाटे वाहुनिया दूर

झाडांनी किती मुकुट घातले डोईस सोनेरी
कुरणांवर शेतात पसरला गुलाल चौफेरी

हिरवेहिरवे गार शेत हे सुंदर साळीचे
झोके घेते कसे, चहुकडे हिरवे गालिचे

सोनेरी, मखमली, रुपेरी, पंख कितीकांचे
रंग किती वर त-हेत-हेचे इंद्रधनुष्यांचे

अशी अचल फुलपाखरे, फुले साळीस जणू झुलती
साळीवर झोपली जणूं का पाळण्यांत झुलती.

झुळकन सुळकन ईकडून तिकडे किती दुसरी उडती!
हिरे माणकें पांचू फुटुनी पंखचि गरगरती!

पहा पांखरे चरोनी होती झाडावर गोळा.
कुठे बुडाला पलीकडे तो सोन्याचा गोळा?
~भा. रा. तांबे

या बालांनो..

या बालांनो, या रे या !
लवकर भरभर सारे या !
मजा करा रे, मजा मजा !
आज दिवस तुमचा समजा.
स्वस्थ बसे,
तोचि फसे;
नवभूमी
दाविन मी,
या नगराला लागुनिया
सुंदर ती दुसरी दुनिया.
या बालांनो ! या रे या !
लवकर भरभर सारे या !

खळखळ मंजुळ गाति झरे,
गीत मधुर चहुंबाज भरे;
जिकडे तिकडे फुलें फळें,
सुवास पसरे, रसहि गळे.
पर जयांचे,
सोन्याचे
ते रावे,
हेरावे.
तर मग कामें टाकुनी या
नवी बघाया ही दुनिया !
या बालांनो, या रे या !
लवकर भरभर सारे या !

पंख पाचुचे मोरांना,
टिपति पांखरें मोत्यांना,
पंख फडकती घोड्यांना,
मौज दिसे ही थोड्यांना.
चपलगती,
हरिण किती !
देखावे
देखावे
तर मग लवकर धावुनी या 
नवी बघाया ही दुनिया !
या बालांनो, या रे या
लवकर भरभर सारे या !
~भा. रा. तांबे

रुद्रास आवाहन
डुमडुमत डमरू ये, खणखणत शूल ये,
शंख फुंकत ये, येई रुद्रा!
प्रलयघनभैरवा, करीत कर्कश खा
क्रूर विक्राळ घे क्रुध्द मुद्रा !

कडकडा फोड नभ, उडव उडुमक्षीका,
खडबडवी दिग्गजां, तुडव रविमालीका,
मांड वादळ, उधळ गिरी जशी मृत्तिका
खवळवीं चहुंकडे या समुद्रां !

पाड सिंहासने दुष्ट हीं पालथीं,
ओढ हत्तीवरुनी मत्त नृप खालती,
मुकुट रंकास दे, करटी भूपाप्रती,
झाड खटखट तुझें खड़ग क्षुद्रां !

जळ तडागं सडे, बुडबुडे, तडतडे
"शांति ही!" बापुडे बडबडती जन-कीडे !
धडधडा फोड तट! रुद्र ये चहुंकडे,
धगधगित अग्निमंधि उजळ भद्रा !

पूर्वी नरसिंह तूं प्रगटुनी फाडिले
दुष्ट जयीं अन्य गृहीं दरवडे पाडिले,
बनुनि नृप, तापुनी चंड, जन नाडिले
दे जयांचें तयां वीरभद्रा!
~भा. रा. तांबे

तिन्ही सांजा सखे मिळाल्या
तिन्ही सांजा सखे मिळाल्या, देई वचन तुला
आजपासुनी जीवे अधिक तू माझ्या हृदयाला
तिन्ही सांजा…

कनकगोल हा मरीचिमाली जोडी जो सुयशा
चक्रवाल हे पवित्र ये जी शांत गंभीर निशा
त्रिलोकगामी मारूत, तैशा निर्मल दाहि दिशा
साक्षी ऐसे अमर करूनि हे तव कर करि धरिला
तिन्ही सांजा…

नाद ऐसा वेणूत, रस जसा सुंदर कवनांत
गंध जसा सुमनांत, रस जसा बघ या द्राक्षात
पाणी जसे मोत्यांत, मनोहर वर्ण सुवर्णात
हृदयी मी साठवी तुज तसा जिवित जो मजला
तिन्ही सांजा…
.
गीत : भा० रा० तांबे 
संगीत: पं० हृदयनाथ मंगेशकर
गायिका: लता मंगेशकर
राग: मिश्र यमन
डोळे हे जुलमि गडे
डोळे हे जुलमि गडे
रोखुनी मज पाहू नका
जादूगरी त्यात पुरी
येथे उभे राहु नका

घालु कशी कशिदा मी?
होति किती सांगु चुका
भोचे सुई फिरफिरुनी
वेळ सख्या, जाय फुका

खळबळ किती होय मनी
हसतिल मज सर्वजणि
योतिल तय संधि बघुनी
आग उगा लावु नका

~कवी : भा. रा. तांबे
संगीत : वसंत प्रभु
गायिका : आशा भोसले














Tuesday, July 12, 2011

कुसुमाग्रज















सर्वात्मका सर्वेश्वरा 

गंगाधरा शिवसुंदरा ।
जे जे जगी जगते तया
माझे म्हणा करुणाकरा ॥
आदित्य या तिमिरात व्हा
ऋग्वेद या हृदयात व्हा
सुजनत्व द्या, द्या आर्यता 
अनुदारिता दुरिता हरा ॥
सर्वात्मका सर्वेश्वरा॥
गीत - वि. वा. शिरवाडकर 
संगीत - पं. जितेन्द्र अभिषेकी 

स्वर - पं. जितेन्द्र अभिषेकी 

नाटक - ययाति आणि देवयानी (१९६६)
===============================================
सर्वात्मका शिवसुंदरा

सर्वात्मका शिवसुंदरा स्वीकार या अभिवादना ।

तिमिरातुनी तेजाकडे
प्रभु आमुच्या ने जीवना ॥


सुमनात तू गगनात तू 
तार्‍यांमध्ये फुलतोस तू
सद्‌धर्म जे जगतामधे
सर्वांत त्या वसतोस तू 
चोहीकडे रुपे तुझी 
जाणीव ही माझ्या मना ॥1॥


श्रमतोस तू शेतांमधे 
तू राबसी श्रमिकांसवे
जे रंजले वा गांजले 
पुसतोस त्यांची आसवे
स्वार्थाविना सेवा जिथे 
तेथे तुझे पद पावना ॥2॥


न्यायार्थ जे लढती रणी
तलवार तू त्यांच्या करी
ध्येयार्थ जे तमि चालती
तू दीप त्यांच्या अंतरी 
ज्ञानार्थ जे तपती मुनी
होतोस त्यांची साधना॥3॥


करुणाकरा करुणा तुझी
असता मला भय कोठले 
मार्गावरी पुढती सदा
पाहीन मी तव पावले
सुजनत्व या हृदयामधे
नित जागवी भीतीविना ॥4॥


~ कुसुमाग्रज

Monday, July 11, 2011

आरती प्रभू



आरती प्रभू 


ज्येष्ठ मराठी लेखक चिंतामण त्र्यंबक खानोलकर उर्फ कवी आरती प्रभू यांचा २६ एप्रिल हा स्मृतिदिन.
  


कवी आरती प्रभू किंवा लेखक चिंतामण त्र्यंबक खानोलकर यांच्या 
उल्लेखाशिवाय मराठी साहित्याचा अभ्यास पूर्णच होऊ शकत नाही. 
चिं. त्र्य. खानोलकर यांचा जन्म ८ मार्च १९३० रोजी कुडाळमध्ये झाला.
 वडिलांचे छत्र लहानपणीच गेल्यावर आई हेच त्यांचे सर्वस्व झाले होते.


आरती प्रभूंचे शिक्षण फारसे झाले नव्हते. बेफिकीरप्रवृत्ती आणि धंद्यातील स्पर्धा यामुळे त्यांचा खाणावळीचा धंदा बसला. देणेक-यांची देणी वाढली. घरातील एकेक वस्तू विकून दिवस कंठण्याची वेळ आली. अशा आर्थिक ओढगस्तीमुळे खानोलकर त्रस्त झाले होते. शाळेत असल्यापासून खानोलकर आरती प्रभू या नावाने कविता करत होते आणि त्यांची पहिली कविता श्री. पू. भागवत यांनी सत्यकथेत छापली होती. खानोलकरांनी आपली हालाखीची स्थिती मधू मंगेश कर्णिकांना कळवली आणि एक दिवस अचानकपणे ते मुंबईत येऊन दाखल झाले.

कोकणात निसर्गाच्या सानिध्यात राहणारे खानोलकर मुंबईत मनापासून कधीच रमले नाहीत. त्यांच्यातील कवी निसर्गात आकंठपणे बुडालेला होता. त्यामुळे त्यांच्या बहुतेक सर्व कवितांमध्ये निसर्गच चित्रित केलेला दिसतो. अशा त्यांच्या या कवितांचा कवितासंग्रह जोगवा मौज प्रकाशनाने प्रकाशित केला. याच दरम्यान त्यांची आकाशवाणीतील भाषण विभागात पाडगावकरांचा असिस्टंट म्हणून नेमणूक केली.

खानोलकरांचा जीवनपट म्हणजे नियतीचा सारीपटच होता असे म्हणावे लागेल. क्षणात प्रतिभेचे तेजनृत्य तर क्षणात विक्षिप्त स्वभावाची कतृत्त्वावर मात , असा नियतीचा सतत चाललेला खेळ त्यांना सातत्याने अनुभवावा लागला. श्री. पु. भागवत , मंगेश पाडगांवकर , मधु मंगेश कर्णिक , विजय तेंडुलकर यांच्यासारख्या प्रतिभावंत मित्रांनी खानोलकरांच्या प्रतिभेचा चमत्कार ओळखून त्यांना सतत मदत केली. त्यांच्या गीतांना चाली लावण्यासाठी स्वतः हृदयनाथ मंगेशकर पुढे येतात आणि या दोन प्रतिभावंताच्या किमयेतून ‘ ये रे घना ’, ‘ नाही कशी म्हणू तुला ’ सारखी गीते अमर होतात.

सतत कवितेच्या धुंदीत वावरणारा हा माणूस ‘ रात्र काळी घागर काळी ’ सारखी कादंबरी लिहितो आणि हरी नारायण आपटे अभ्यासवृत्ती मिळवतो. ‘ अजगर ’सारख्या कादंबरीवर अत्र्यांसारख्याचे आसूड खातो. पुढे ‘ माकडाला चढली भांग ’नाटकाला अंत्र्याकडून शाबासकीही मिळवतो. आधुनिक नाटककारांबद्दल काही माहिती नसताना केवळ अभिजात प्रतिभेने ‘ एक शून्य बाजीराव ’ सारखे नाटक लिहितो आणि रंगायनसारखी संस्था ते रंगभूमीवर आणते. एक इतिहास घडतो. ‘अवध्य ’ सारख्या नाटकातून रंगभूमी गाजवतो आणि मराठी नाटक वयात आल्याची ग्वाही माधव मनोहरांसारखा व्यासंगी समीक्षक मुक्तमनाने देतो. कोंडूरा कादंबरीचा अजब विषय सत्यजित रे सारख्या जागतिक कीर्तीच्या चित्रसम्राटाला टाकवून टाकतो आणि त्यावर चित्रपट काढावा असे त्याला वाटते. व्ही. शांतारामासारख्यांना चानी मोहात टाकते. अजब न्याय वर्तुळाचा जर्मनीपर्यंत पोहचते आणि नाट्यसृष्टीत एक चमत्कार घडतो.

८ मार्च १९३० रोजी कोकणच्या भूमीवर अवतरलेले नियतीच्या पटावरचे हे प्यादे २६ एप्रिल १९७६ पर्यंत अनेक चौकोनातून फिरत वेगवेगळ्या चालीने संचार करीत अखेर नियतीने पटाबाहेर नेले.

- अमिता जामखेडकर
(पुनर्मुद्रीत)
चिंतामणी त्र्यंबक खानोलकर 

चिंतामणी त्र्यंबक खानोलकर ऊर्फ आरती प्रभू (८ मार्च, इ.स. १९३०- २६ एप्रिल, इ.स. १९७६)
मराठी कवी, लेखक होते. कोकणातल्या कोण्या एका गावी त्यांच्या मातोश्री खानावळ चालवीत.
तेथे गल्ल्यावर बसुन खानोलकर कविता करत. त्यांच्या खानावळीत जेवायला येणार्‍या काही
मंडळींनी त्यांच्या कवितेचे काही कागद चोरून त्या कविता आरती प्रभू या नावाने
'मौज' मधे छापण्यास पाठवुन दिल्या. मौज' च्या अंकात आपल्या कविता प्रकाशित
झाल्याचे बघून खानोलकर बावरून गेले. त्या अवस्थेतच त्यांनी खालील कविता लिहिली.
ये रे घना
ये रे घना
न्हावूं घाल
माझ्या मना ...
खानोलकरांना भीती होती कि अचानक मिळालेल्या या प्रसिध्दीमुळे आपली प्रतिभा,
आपल्याला मिळालेली शब्दांची हि देणगी आपल्या हातुन निसटुन तर जाणार नाहीना.
पण तसे काही झाले नाही. त्यांच्या प्रतिभेचा सूर्य त्यांच्या अकाली निधना पर्यंत मराठी
साहित्य सॄष्टीत तळपतच राहिला.
प्रकाशित साहित्य 

  • गणूराय आणि चानी (कादंबरी, १९७०)
  • कोंडुरा (कादंबरी, १९६६)
  • अजगर (कादंबरी, १९६५)
  • रात्र काळी, घागर काळी (कादंबरी, १९६२)
  • त्रिशंकू (कादंबरी, १९६८)
  • आपुले मरण
  • जोगवा (काव्यसंग्रह, १९५९)
  • दिवेलागण (काव्यसंग्रह, १९६२)
  • नक्षत्रांचे देणे ((काव्यसंग्रह, १९७५)
  • पिशाच्च ((कादंबरी, १९७०)
  • पाषाण पालवी ((कादंबरी, १९७६)
  • सनई (कथा संग्रह, १९६४)
  • राखी पाखरू (कथा संग्रह, १९७१)
  • चाफा आणि देवाची आई (कथा संग्रह, १९७५)
  • एक शुन्य बाजिराव (नाटक, १९६६)
  • सगेसोयरे (नाटक, १९६७)
  • अवध्य (नाटक, १९७२)
  • कालाय तस्मै नमः (नाटक १९७२)
  • अजब न्याय वर्तुळाचा (नाटक, १९७४)
पुरस्कार 
१९७८ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार "नक्षत्रांचे देणे " साठी 

अंत झाला अस्ता आधी,जन्म एक व्याधि
वेदानांचे गाणे म्हणजे पोकळं समाधि
देई कोण हळी त्याचा पडे बळी आधी
हारापरी हौताम्य हे त्याच्या गळी साजे

कुणाच्या खान्द्यावरं कुणाचे ओझे ?

दीप सारे जाती येथे विरून विझूनं
वृक्ष जाती अन्धारात गोठुन झडून
जिवानाशी घेती पैजा घोकून घोकून
म्हणती हे वेडे पीर तरी आम्ही राजे 


कुणाच्या खान्द्यावरं कुणाचे ओझे ? 

कशासाठी उतरावे तम्बू ठोकुन
कोण मेले कोणासाठी रक्त ओकून
जगातात येथे कुणी मनात कुजुन
तरी कसे फुलंतात गुलाब हे ताजे

कुणाच्या खान्द्यावरं कुणाचे ओझे ?

कुणाच्या खान्द्यावरं कुणाचे ओझे ?
~आरती प्रभू